कितीदा तुम्ही न्यूज बनवणार आणि कितीदा मोर्चे काढणार..??
मुलींना अंगभर कपडे घालायला शिकवणार..?
नजर खाली घालून चालायला शिकवणार आणि,
सहन करायला शिकवणार..??
कधी आपल्या मुलांना शिकवलंय का कि रस्त्याने चालणारी मुलगी तुमच्या बापाची प्रॉपर्टी नसते..
ती कोणाची तरी बहीण, मुलगी, आई, बायको आणि प्रेयसीही असते..
कोणाच्यातरी घरातली जबाबदार व्यक्ती असते..
आणि शरीराची भावना इतकी विक्राळ व्हावी कि त्या भावनेला कुठलीच मर्यादा राहू नये,
इतकंच नव्हे तर जिवंतपणी जाळून टाकावं..??
म्हणजे जेव्हा केव्हा अशी घटना घडते तेव्हा प्रचंड संताप होतो..
सगळ्यांचाच..
मी म्हणत नाहीये कि पुरुषसत्ताक समाज पुरुषांनीच बनवलाय असं..
यात सहन करणारी प्रत्येक स्त्रीही तेवढीच गुन्हेगार आहे..
आणि त्याहूनही, त्या महिला गुन्हेगार आहेत ज्या अशा पुरुषी परंपरांना साथ देतात आणि सबलीकरण करतात..
जेव्हा कोणी एखादा गुन्हा करतो तेव्हा 'त्याच्या' गुन्ह्याबाबत न बोलता 'तिच्या' कपड्यांबाबत, वयाबाबत, वेळ-काळाबाबत
आणि तिच्या सवयींबाबत बोललं जातं.. का..??
कधी ऐकलंय का कि कुणी मुलगा बनियन आणि शॉर्ट्सवर फिरतोय म्हणून मुलींच्या कुठल्याही टोळीने त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं??
आपल्या घरातही बाबा आणि भाऊ घरात उघडे फिरत असतात, पण कधी मुलींची नजर फिरलीये का..??
मग मुलांच्याच भावना का चाळवतात..??
ती ना, छोटेच कपडे घालायची.. ती तर ओठ लाल करून आणि मेकअपच करून फिरायची.. आणि हि तर काय, मुलांसोबत फिरायची..
म्हणून ह्यांच्यासोबत असं झालं..
अरे मग ज्या डायपरमध्ये होत्या त्यांनी काय केलं होतं..?? आणि त्या पाय लटपटत चालणाऱ्या आजीने कसलं प्रदर्शन केलं होतं रे..??
मला त्या प्रत्येक व्यक्तीविषयी संताप आहे जी व्यक्ती मुलींचे मापदंड ठरवते..
दोष जर मुलींमध्ये असता तर मुली बलात्कार करत फिरल्या असत्या..
पण इथं प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून बघण्याचा..
ज्याचा कोणीही विचार करत नाय..
मुळात प्रेम काय आहे हे ज्याला समजतं ती व्यक्ती कधीच या टोकापर्यंत येत नसते..
आणि जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला ती भावना समजलेलीच नसते..
हे सगळं लिहिताना आणि विचार करताना माझा कितीदा संतापाने डोळ्यात पाणी आलंय..
माहित नाय..
काल 'ती' होती..
आजही 'कोणी' असेल..
उद्या 'मी'ही असू शकेल..
पण मला भीती नाहीए.. जितक्या आत्मविश्वासाने मी काल रस्त्याने जात होते तितक्याच ताकदीने मी आजही चालत राहीन आणि माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मुलीला ही हिंमत देण्याचा प्रयत्न करीन..
आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत असल्या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांवर थुंकत राहीन..
लिहीत राहीन आणि यांच्या नसलेल्या इज्जतीचे ताशेरे उडवून अघोरी आनंद घेत राहीन..
कधी माझ्यावर जर असा प्रसंग ओढावलाच तर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, मी लढतच राहीन..
तुम्हीही बघा, विचार करा, ठरवा..
आणि प्लिज, नेहमीप्रमाणे फक्त विचार करू नका ना..
कमीत कमी आपल्या आसपास असलेल्या मुलाशी किंवा पुरुषाशी याबाबत बोला..
explain करा..
समजावून सांगा..
ही फक्त पोलिसांची किंवा समाजसेवकांची किंवा शासनाची जबाबदारी नाहीये..
कुठल्या ना कुठल्या मुलीशी कुठला ना कुठला संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ही नैतिक जबाबदारी आहे..
व्यक्त होत राहा.. मन मोकळं करत राहा..
हा आपलाच समाज आहे आणि इथं आपल्यालाच राहायचंय..
मग सुरक्षित आणि सेफ राहुयात ना..
.
.
.
.
प्राchi.. 💞
No comments:
Post a Comment